रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग आणि समाजशास्त्र विभागांतर्गत मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शुभांगी कुलकर्णी उपस्थित होत्या. सामाजिक जडण घडण आणि समाजशास्त्र या विषयवार मार्गदर्शन करताना, विविध गोष्टी शिकून, त्याचा अनुभव घेऊन मनुष्य आपल्या आयुष्याची जडणघडण करत असतो. समाजामध्ये वास्तव्य करण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला विभाग प्रमुख ऋतुजा भोवड, समाजशास्त्र विभागप्रमुख हरेश केळकर, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस आग्रे याने तर अनन्या धुंदूर यांनी आभार मानले.