Breaking : भर बाजारपेठेत भूल टाकून व्यवसायिकाला लुटले

रत्नागिरी : शहरातील राम आळीत एका व्यवसायिकाला भूल टाकून आपल्यासोबत नेत आठवडा बाजार येथे लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी बाजारपेठेत टेलरिंग चा व्यवसाय करणारे एक व्यवसायिक आज नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडण्यास येत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्यवसायिक राम आळीतून आपल्या दुकानात जात असताना दोन व्यक्तींनी त्याला भुलवले व आठवडा बाजार येथे घेऊन गेले. येथे नेऊन या व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठी असा ऐवज काढून घेतल्याची माहिती मिळत आहे. जरा वेळाने भानावर आल्यावर सदर व्यवसायिकाच्या ही गोष्ट लक्षात आली अशी माहिती मिळत आहे. व्यवसायिकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बाजारातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून तक्रार देखील नोंदवण्यात असल्याची माहिती मिळत आहे. भर बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here