…तर आपला भारत नक्कीच महासत्ता बनेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. तर आज देश राजकारण बाजूल ठेवून एकत्र आला आहे. ही एकता कायम राहिली तर आपण महासत्ता बनू शकतो, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी नागरिकांना काही सूचना केल्या. मास्क लावा, घरातून बाहेर पडण टाळा, गर्दी करू नका. राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा सुरळीत राहणार आहे, असे ठाकरे म्हणाले. महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. आता समोरून रुग्ण ३३ हजारच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये १००० जण COVID 19 बाधित आहेत. मात्र ते आता बरे होत आहेत. त्यांच्यामध्ये सुरवातीची लक्षण होती, त्यामुळे ते आता बरे होत आहेत. मृतांची संख्या वाढत आहेत. उशिरा उपचारासाठी जे आले त्यांचा मृत्यू झाला, असा खुलासा ठाकरेंनी केला. पुढील सूचना या वेळोवेळी दिल्या जातील. विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योग, कारखाने कधी सुरु होणार याबाबत विचार, चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लवकरच आपण या सर्व परिस्थितीवर मत करू शकतो. आज देश एकटवलेला आहे. असाच देश एकत्र राहिला तर आपण महासत्ता बनू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here