सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसप्रमाणे खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही केंद्र सरकारने विम्याचं सुरक्षा कवच दिलं पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील 22 लाख वैद्कीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने 128 कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता भरला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही ही सुविधा द्यावी. त्यांनी काय घोडं मारलं आहे, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.