रत्नागिरी : राजा राममोहन रॉय यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त शालेय मुलांची महिला सक्षमीकरण जनजागृती फेरी गुरुवारी रत्नागिरीत काढण्यात आली. फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या फेरीत फाटक हायस्कूल, शिर्के हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल आदी शाळेतील मुलींनी सहभाग घेतला. शिक्षक, अधिकारी, कर्मचारीदेखील या फेरीत सहभागी झाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 23/Sep/2022