रामपूर : गुहागर आगारातून संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान गुहागर-तुळजापूर एस.टी.फेरी कायमस्वरुपी सुरू करावी, अशी मागणी कोकण प्रवासी महासंघ ग्रामीण विभाग अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.
तुळजापूरहून सकाळी ७.३० तुळजापूर-गुहागर एस. टी. बस सोडावी. गुहागर, चिपळूण तालुक्यातून तुळजापूर, मराठवाड्यात जाणारे प्रवासी आहेत. एसटी फेरी सुरू केल्यानंतर प्रवाशांना त्याची माहिती मिळावी. ही फेरी सुरू केल्यास एस.टी.ला उत्पन्न चांगले मिळेल. तातडीने गुहागर – तुळजापर एस.टी.फेरी सुरू करण्याची मागणी जोशी, उपाध्यक्ष गणेश चव्हाण, कार्याध्यक्ष वसंत भोसले, वेंगसरकर, दिलीप चव्हाण यांनी केली आहे.