सध्या कोरोनामुळे उद्धभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मंडळींना सोयीचे व्हावे म्हणून सध्याचे रेल्वेचे 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण हे रद्द करावे व गणेश चथुर्तीच्या 30 दिवस अगोदर रेल्वेचे आगाऊ आरक्षण सुरू करावे याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून विनंती केली. गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण 17 एप्रिल पासून सुरु होणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचे आरक्षण 120 दिवस अगोदर सुरु न करता 30 दिवस आधी तिकीट बुकींग सुरु करावी, अशी मागणी खा. विनायक राऊत यांनी यावेळी केली आहे.
