अकोला : पीएफआयवर जी बंदी घातली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. जी संस्था आतंकवादाला समर्थन करीत असेल आणि भारत पाकिस्तान करून जी राजकारण करण्याची भूमिका जी भाजपची होती. ती पुण्याच्या घटनेमुळे समोर आली. पाकिस्तान जिंदाबादचे नारे जे लागले हे आम्ही पाहिले आणि म्हणून ही मागणी केली की पीएफआयवर बंदी घालावी. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली, त्याचे आम्ही स्वागत करतो. पण हा उशिरा का झाला, किती लोकांनी त्या आंतकवाद्यांना मदत केली याचा रिपोर्ट जनतेला सरकारने द्यावा, ही मागणी यानिमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ही शंका निर्माण होत असल्याचे सांगितले. ज्यावेळेस शिवसेनेने 16 आमदारांचे पत्र दिले होते त्यांच्यावर कारवाई करावी, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला. त्या प्रक्रियेला थांबविले. मग चिन्हाचा वाद आला. त्यांच्यातही निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने थांबविले. या पद्धतीचा संभ्रम न्यायव्यवस्थेने निर्माण करणे हा शकेचा भाग आहे. खर तर आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण न्यायव्यवस्थेवर संभ्रम निर्माण होणे हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे लहणपोरांचा स्पायडरमॅन जसा राहायचा तशा प्रकारचा एक पालकमंत्री होत असेल तर कुठल्या जिल्ह्याला न्याय मिळणार, किती वेळ देणार पालकमंत्री हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पद्धतीची राज्यातील लोकशाही व जनतेची थट्टा करण्याचे पाप जे भाजप करते आहे हे फार वाईट आहे, याचा आम्ही निषेध करतो, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 28/Sep/2022