पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पराकोटीला गेले आहेत.
दोघांनीही दसरा मेळाव्यात सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत या राजकीय गदारोळात महागाई आणि बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न बाजूला पडत आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
महागाईने जनता होरपळत असून इंधन, सीएनजीच्या नुकतेच झालेल्या दरावाढीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष्य वेधले.
पवार आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. थेरगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. मुंबईत रात्री होणार असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यावी. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा , आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. पण, लोकशाहित काही परंपरा असतात, त्या जपाव्यात. कोणाचाही अनादर करू नये. महाराष्ट्राच्या परंपरेला बाधा येणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही अशा पद्धतीने वागावे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:45 PM 05/Oct/2022