रत्नागिरी : विजयादशमीदिवशी नवरात्रौत्सवाची सांगता झाली. बुधवारी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात साडेचारशे दुर्गामातेच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.
26 सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 394 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सव आणि 56 ठिकाणी खासगी नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबाही रंगला. नऊ दिवस भक्तीभावाने दुर्गामातेची पुजाअर्चा करण्यात आली. नवरात्रौत्सव मंडळांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच अशा मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी वाजतगाजत दुर्गामातेच्या विसर्जनाच्या मिरवणूका निघाल्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 06/Oct/2022