रत्नागिरी शहरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात ऐन पावसाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पंप पाण्याखाली गेल्याने एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा ठप्प आहे तर पानवल डोंगर खचल्याने पानवल धरणातून येणारी लाईन गाडली गेल्याने येथील पाणी पुरवठा देखील बंद आहे. अशातच शीळ धरणातील वीज मंगळवारी मध्यरात्री बंद झाल्याने शीळ धरणातुनही कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. यामळे निम्म्या शहरात भिषण पाणी टंचाई सुरू आहे. ऐन पावसाळयात नागरीकांना टँकरसाठी रांगा लावाव्या लागत असल्याची परिस्थीती आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुडगुस घातल्याचे चित्र आहे. आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागात पूरस्थिती आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीतही रत्नागिरी शहरात भिषण पाणी टंचाई सुरू आहे. याला कारणीभूत देखील मुसळधार कोसळणारा पाऊसच आहे. मुसळधार पावसाने एमआयडीसह पानवल धरणातील पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. पानवल धरणानजिक असलेला डोंगरातुन मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले आहे. या भुस्खलनात पानवल धरणातुन रत्नागिरीकडे येणारी पाईपलाईनच गाडली गेली आहे. गाडल्या गेलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. परंतु, याला चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने या चार दिवसांत पानवल धरणातुन होणारा पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. याशिवाय एमआयडीच्या हरचिरी धरणातील पंप पाण्याखाली बुडाले आहेत. या भागात मुसळधार पाऊस कोसळल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चार दिवसांपासून हरचिरी धरणातुन होणारा पाणी पुरवठा देखील ठप्प आहे. पानवल आणि एमआयडीसीसह शीळ धरणातील वीज मंगळवारी रात्री गायब झाल्याने पाणी वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. शीळ धरण परिसरात वीज गेल्याने बुधवारी पाण्याच्या टाक्यांची लेवल होऊ शकली नाही. अशातच एमआयडीसी आणि पानवल धरणातुन ज्या निम्म्या शहराला पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणीही शीळ धरणातुन पाणी पुरवठा सुरू होता. परंतु, शीळ धरणातील वीज गायब झाल्याने बंधवारी शहरवासीयांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली. एमआयडीसी आणि पानवल धरणातुन पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट कायम राहण्याची चिन्हे आहेत.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here