रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या चाणाक्षतेमुळे तीन जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून रत्नागिरी शहरात प्रवेश करणाऱ्या दोघांना पकडले

0

रत्नागिरी : मनोरुग्णालयातून औषधे घ्यायची आहेत असे सांगत वाळवा तालुक्यातून निघालेल्या दोन इसमांना साळवी स्टॉप येथील तपासणी नाक्यावर वाहतूक पोलिसांनी पकडले. यांच्याकडे स्थलांतर करण्याची कोणतीही परवानगी नसताना सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून चारचाकी गाडीने हे दोन इसम रत्नागिरीत आले. मात्र रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून यांची सुटका झाली नाही. या दोघांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:23 PM 23-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here