रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथे खासगी इमारतीच्या टेरेसवर एकत्र येत नमाज पठण करणाऱ्या २५ जणांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करण्यासाठी एकत्र येऊ नये असे प्रशासनाने व मौलविनी देखील यापूर्वी आवाहन करूनही त्यांच्या सूचनांना काही जणांनी हरताळ फासण्याचे काम केले. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या एका पथकाने मिरकरवाडा येथे जाऊन सामुहिक नमाज पठण करणाऱ्या २५ जणांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन करून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचे कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी ही माहिती दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
08:40 PM 24/Apr/2020