रत्नागिरी : कामगार सहायक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. ३१ रोजी रत्नागिरीमध्ये झालेल्या सभेत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
सर्वस्तरीय कामगार यांच्या संरक्षण आणि संवर्धनाकरिता संस्था स्थापन करण्यात आली असून संस्थेमार्फत कामगारांना शासकीय लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून रिजवाना शेख यांची नियक्ती करण्यात आली. दत्ता माने यांना रत्नागिरी तालुका अध्यक्ष तसेच संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहर अध्यक्षपदी चुडप्पा मिराशी यांची निवड केली आहे.
संस्थेने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण करू, अशी ग्वाही शेख व माने यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष रमेश थोरात, कार्याध्यक्ष राजेंद्र कळंबटे, संस्था सचिव श्री. सोनावले, सहसचिव गजानन जाधव, प्रमोद कांबळे आणि संघटक दीपक पवार उपस्थित होते.