बारावी नंतरच्या सीईटी परीक्षा आणि युजीसीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. ‘मंगळवारी सर्व कुलगुरूंसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे, त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतर काही दिवसांत सर्वच परीक्षांबाबत निर्णय होईल’, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
