मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४,५४१ झाली असून त्यात गेल्या २४ तासांत नव्याने तब्बल ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या २४ तासांत ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू होवून आतापर्यंत ५८३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
