नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही.
भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी वाढली आहे. गेल्या 24 तासांत 279 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, एकही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान देशातील कोरोना संसर्ग किंचित घटला असला, तरी धोका कायम आहे. जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
देशात सक्रिय रूग्णांची संख्या
देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच मंगळवारी हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 4,46,72,347 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांवर आहे. देशात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या चार हजार 855 वर पहोचली आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.