रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील जेलनाका येथे बुधवारी दुपारी विचित्र अपघात झाला. अपघात झाल्यानंतर रिक्षा चालक रिक्षातून बाहेर फेकला गेला आणि रिक्षाचे स्टेअरींग लॉक झाले. स्टेरींग लॉक झाल्याने रिक्षा जवळपास दोन मिनिट विनाचालक गोलगोल फिरत राहिली.
बुधवारी दुपारी याच अपघाताची चर्चा शहरभर होती. विनाचालक रिक्षा फिरलीच कशी याची चर्चा प्रत्येक नाक्यावर सुरू होती. वास्तवात अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा बाहेर फेकला गेला. याचवेळी रिक्षाचे स्टेअरींग एका बाजूला लॉक झाले. रिक्षा चालू अवस्थेत राहिल्याने रिक्षा जेलनाका सर्कल येथे गोलगोल घिरट्या घालत राहिली. बराच वेळ हा प्रकार सुरू राहिल्याने बघ्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती.
काहीजणांनी पुढे येत रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर सर्वांनी एकत्र प्रयत्न केल्यानंतर रिक्षा थांबवण्यात यश आले. या अपघातात इतर वाहनांचे नुकसान झाले नसले तरी रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघाताची बुधवारी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 01/Dec/2022
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 01/Dec/2022