चिपळूण : चिपळूण शहरातील मुरादपूर विभागातील पाणी प्रश्नासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल घेऊन माजी नगरसेवक करामत मिठागरी यांसह स्थानिक नागरिक व महिलांनी चिपळूण नगर परिषदेवर बुधवारी धडक दिली.
यावेळी त्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. यावेळी शहरातील बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुरादपूर विभागासह शहरातील खंड, उक्ताड व इतर भागांतील पाण्याची गैरसोय तसेच पाण्याच्या वेळेचे नियोजन प्रशासनाने करणे हे खूप महत्त्वाचे असल्याची माहिती मुख्याधिकारी शिंगटे यांना दिली.
यावेळी यतीन कानडे, विकी लवेकर, अंकुश आवले, निहार कोवळे, सचिन शेट्ये, राकेश देवळेकर, सचिन हातिस्कर, शुभम कदम, विशाल नरळकर, ओंकार नलावडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 08/Dec/2022