मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यानंतर शहरात दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती; मात्र याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे १४० हून अधिक दुचाकी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर विनाकारण दुचाकी चालविणाऱ्या ६५४ वाहनचालकांवर सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २३ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
Home महाराष्ट्र संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या ६५४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; १४० हून अधिक दुचाकी...