रत्नागिरी : सुधारित पाणी पुरवठा योजने सह अनेक कामांवर अतिरिक्त खर्च करावा लागल्याने रत्नागिरी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे.
शासनाकडून निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आलेले पैसेही अन्यत्र खर्च होत असून शहराअंतर्गत कामांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी निधीची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान नगर परिषदेसमोर आहे.
त्यामुळे नगर परिषदेच्या १३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन कोटी देणे नगर परिषदेकडे थकीत आहे. हे पैसे मिळावेत यासाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सतत नगर परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत असून हे पैसे कधी मिळणार असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. शासनाच्या विविध योजनांच्या तांत्रिक मंजुरीसाठी (टी.एस.) काही टक्के रक्कम आणि योजनेच्या एकूण खर्चातील ९ ते १० टक्के भरावी लागणारी रक्कम, सुधारित पाणी योजनेवरील करोडो रुपयांचा अतिरिक्त खर्च, यामुळे रत्नागिरी नगरपालिकेचा स्वनिधी गेल्या वर्षभरात संपुष्टात आला असून नगरपालिकेची तिजोरी रिकामी झाल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षभरात रस्त्याच्या दुरुस्तीवर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चामुळे नगरपालिकेची कोंडी झाली आहे. त्याचा परिणाम नवीन विकासकामांवर होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 09-12-2022