रत्नागिरी : जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण अकरा अधिकाऱ्यांच्या अन्य
पोलीस जिल्ह्यात बदल्या झाल्या असून, त्या बदल्यात फक्त दोन पोलिस निरीक्षक रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची सातारा येथे, निशा जाधव यांची मुंबई, अरविंद घोडके यांची सांगली, विनीतकुमार चौधरी यांची पदोन्नतीवर प्रतीक्षेत बदली झाली असून चार निरीक्षकांच्या बदल्यांत रत्नागिरीमध्ये कोल्हापूरहून दत्तात्रय नाळे, सुदाम माने हे अधिकारी दाखल होणार आहेत.
रत्नागिरीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरील भैरु जाधव यांची मुंबई रेल्वे, संदीप पाटील यांची मुंबई शहर, आबासो पाटील यांची मुंबई शहर, मधुकर मौळे यांची मुंबई शहर, संजय कातीवले यांची लोहमार्ग मुंबई आणि चित्रा मडवी यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक पदावरील निपाद काळे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 10-12-2022