रत्नागिरी : जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या मिळून एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांची बदली अन्य जिल्ह्यात झाली आहे.
मात्र त्याबदल्यात केवळ दोन पोलीस निरीक्षक रत्नागिरी जिल्ह्याला आतापर्यंत मिळाले आहेत. उर्वरित अधिकारी कधी मिळणार याची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची सातारा येथे, निशा जाधव यांची मुंबई, अरविंद घोडके यांची सांगली, विनीतकुमार चौधरी यांची पदोन्नतीवर प्रतिक्षेत बदली झाली असून चार निरीक्षकांच्या बदल्यात रत्नागिरीमध्ये कोल्हापूरहून दत्तात्रय नाळे, सुदाम माने हे अधिकारी दाखल होणार आहेत.
रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील भैरु जाधव यांची मुंबई रेल्वे, संदीप पाटील यांची मुंबई शहर, आबासो पाटील यांची मुंबई शहर, मधुकर माळे यांची मुंबई शहर, संजय कातीवले यांची लोहमार्ग मुंबई आणि चित्रा मडवी यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक पदावरील निपाद काळे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 12-12-2022