रत्नागिरी : कृषी वगळता अन्य ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे, अशा ग्राहकांसाठी शासनाकडून ‘विलासराव देशमुख अभय योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अवघे १४ दिवस शिल्लक राहिले आहेत.
विलासराव देशमुख अभय योजनेंतर्गत ३७१ ग्राहकांनी लाभ घेत ७२ लाख ५३ हजार रुपये भरले असून, या ग्राहकांना ४ लाख ६६ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे, अशा ग्राहकांना नव्याने वीज जोडणी घेता येणार आहे. कृषीचे ग्राहक वगळता ही योजना अन्य ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ डिसेंबरअखेर मुदत देण्यात आली आहे. नव्याने वीज जोडणी घेत व्याज व विलंब आकारात शंभर टक्के सवलतीचा ग्राहकांनी लाभ घेतला आहे. चिपळूण विभागात या योजनेंतर्गत १०८, खेड विभागातील १५० व रत्नागिरी विभागातील ११३ मिळून एकूण ३७१ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. १४ दिवसांत ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 16-12-2022