रत्नागिरी : लॉकडाउनमूळे अडकून पडलेल्या नागरिकांना अनेक परवानग्यांचे मांडव ओलांडताना नाकीनऊ आले त्यात आता एसटी महामंडळ अडकलेल्या नागरिकांच्या असहाय्यतेचा गैरलाभ घेताना दिसत आहे, असे मत adv. दीपक पटवर्धन यांनी मांडले आहे. एसटी महामंडळाने खरं तर नागरिकांना मोफत प्रवासाची सोय करून अडकलेल्या नागरिकांना स्वगृही पाठवण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते, मात्र शासनाने संवेदनशीलतेला हरताळ फासत नागरिक प्रवाश्यांना जाण्यासाठी 44 रु व रिकामी गाडी परत येईल त्या साथ 44 रु प्रति किलोमीटर असा दर अधिक 50 रु असे चार्जेस भरून प्रवासाची सुविधा देऊन आधीच पिचलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या परिस्थितीची चेष्टा केली आहे. ही शुद्ध पिळवणूक आहे, निर्दयता आहे, हा निर्णय लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या शासनाचा नसून संधीसाधू दलालांची मानसिकता जोपासलेल्या वृत्तीचा आहे. जाण्याचे आणि परत येणाऱ्या गाडीचे चार्जेस घेण्याच्या निर्णयाचा निषेध करावा तेवढा थोडा असून सरकारचे मनसुबे कोरोना संकटात अडचणीत सापडलेल्या जनतेला लुटण्याचे आहेत असे स्पष्ट दिसते. सरकारने एसटी महामंडळाला तात्काळ जिजिया करासारखा आकारलेला दर रद्द करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जिल्हा bjp करत आहे, असे जिल्हाध्यक्ष adv. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:15 AM 08-May-20
