राजापूर : रत्नागिरीहून पाचलकडे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी नेताना राजापूर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ३० डिसेंबर रोजी सायंकाळी सौंदळ कोंड (ता. राजापूर) येथे करण्यात आली. राकेश दीपक हतफळे (२६, रा. नाचणे शांतीनगर, गणेश कॉलनी, रत्नागिरी) आणि विकास आत्माराम भोळे (४३, रा. मिरजोळे – पाटीलवाडी, रत्नागिरी, मूळ रा. शिवणे खुर्द, राजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी राजापूरचे पोलिस नाईक सचिन काशिराम वीर (३३) यांनी फिर्याद दिली आहे. दोघे इको गाडी (एमएच ०८, झेड ८८९४) मधून दारूची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 02-01-2023