रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे येथे आजाराला कंटाळून वृद्धाने पाण्याने भरलेल्या चिरे खाणीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना दि. १ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
शिवाजी भिकाजी साळवी (६४, रा. कोळंबे, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. शिवाजी साळवी हे गेल्या ६ महिन्यांपासून अर्धांगवायू आजाराने त्रस्त होते. या आजारालाच कंटाळून त्यांनी चिरे खाणीत उडी घेत आत्महत्या केली. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्यामागचे कारण समजू शकले असून, अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 03-01-2023