पाठक बाई लग्नानंतर प्रथमच मूळ गावी कोकणात

0

सावंतवाडी : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजली पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर यांनी आपल्या मुळ गावी सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेला भेट देत ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

लग्नानंतर पहिल्यांदाच पती हार्दिक जोशी सह ओटवणेत आल्या होत्या.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अक्षया देवधर या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावच्या त्याचे नातेवाईक आजही ओटवणे येथे असून आई वडिल मात्र मुंबई येथे राहतात त्या अधूनमधून ओटवणे गावात येत जात असतात.अलिकडेच अक्षया देवधर यांनी त्याच मालिकेतील हार्दिक जोशी या अभिनेत्याशी लग्न केले.

या लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी अक्षया या ओटवणे येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन पत्रिका ठेवली होती.तसेच आपल्या ओटवणे येथील मूळ घरी जाऊन नातेवाईकांना ही पत्रिका दिली होती. त्यावेळी त्याचा कुठेही गाजावाजा झाला नव्हता.

पण लग्नानंतर प्रथमच त्या ओटवणे येथे आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या सोबत फोटोसेशन केले मात्र त्या एकदम सर्वसामान्य माणसा सारख्या मंदिरात गेल्या व लागलीच कोल्हापूर च्या दिशेने निघून गेल्या अक्षया देवधर या मूळच्या ओटवणे येथील असल्याचे प्रथमच समोर आल्याने अनेकांना आर्शचयाचा धक्काच बसला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 03-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here