मुंबई : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब येऊन विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपले अर्ज दाखल करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:42 PM 11-May-20
