दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्लेमध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी भीषण वणवा लागला. या भीषण वणव्यात 30 बागा जळून खाक झाल्या आहेत.
वणव्यात जळून खाक झालेल्या बागांमध्ये आंबा, काजूच्या जुन्या बागांचा समावेश आहे. आंबा आणि काजूच्या नव्यानं लागवड केलेल्या बागाही वणव्यात जळून खाक झाल्या आहेत.
वणवा नेमका कशामुळे लागला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात सुरुवात झाली आहे.
ज्या भागांमध्ये झाडं जळून खाक झाली आहेत, अशा जागेवर शासनाच्या शंभर टक्के अनुदानाच्या लागवडीचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 11-01-2023