आंबा उत्पादकांना कर्जफेडीसाठी मुदतवाढ मिळावी : बाळ माने

रत्नागिरी : यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आंबा उत्पादन कमी असल्याने आंबा उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना कर्ज फेडण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ द्यावी आणि त्यावरील व्याज केंद्र सरकारने भरावे, अशी मागणी आंबा उत्पादक शेतकरी तथा माजी आमदार बाळ माने यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यावर्षी आंबा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यात उत्पादनही अवघे तीस टक्के आहे. सध्या आंब्याचा दर हा स्थिर आहे. मात्र यंदा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी ३० जून २०२० ऐवजी ३० जून २०२१ अशी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here