१२ कि.मी.तील वाहनांना टोलमाफी

0

◼️ काम पूर्ण होईपर्यंत हातविलेत टोलवसुली नाही : ना. उदय सामंत

रत्नागिरी : जोपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर भागातील काम पूर्ण होत नाही तोवर हातिवले (ता. राजापूर) येथे टोलवसुली करू नये, अशा सूचना संबंधित एजन्सीला दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच टोलनाक्याच्या परिसरातील सुमारे १२ किमी अंतरामधील वाहनधारकांचा टोलमाफी असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येत होती; मात्र स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केला. आता पुन्हा टोलवसुलीची हालचाल सुरू झाली आहे. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केला.

सामंत म्हणाले, महामार्गाचे या भागातील काम पूर्ण होत नाही तोवर टोलवसुली करू नये, असे आदेश एजन्सीला दिले आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना यातून सूट मिळणार नाही; टोलनाक्याच्या सुमारे १२ किमीपर्यंत असणाऱ्यांना टोलमाफी मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 13-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here