नवी दिल्ली : देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच असून देशात मागील २४ तासांत १२२ लोकांनी आपला जीव गमावला आहे, ३५२५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांत १९३१ जणांनी कोरोनावर मात केली असून हा आकडा आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा सर्वाधिक आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा आतापर्यंत ७४,२८१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २४१५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २४ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:43 AM 13-May-20