मुंबई : सध्या देशाच्या विविध भागात थंडीची लाट पसरली आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.
विशेषत: उत्तर भारतात आणि उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे.
अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात लवकरच थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस थंडी वाढतच आहे. त्यामुळं हा थंडीचा जोर कधी कमी होणार याची नागरिक प्रतिक्षा करत आहेत. अशात हवामान विभागानं दिलासा देणार बातमी दिली आहे.
येत्या 19 जानेवारीपासून म्हणजे गुरुवारपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात थंडीची लाट कमी होणार असून, नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 17-01-2023