मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५,९२२ झाली आहे. गेल्या २४ तासांत १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ५४ मृत्यू झाले असून आतापर्यंत ९७५ जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.
