रत्नागिरी : तापमानात घट झाल्यामुळे कोकण किनारपट्टी भागात आठवडाभर गारठा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यातील तापमानामधील चढ-उतारामुळे थंडी गायब होण्याची भीती व्यक्त केली जात असताना थंड वातावरणाने बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या शनिवारपासून वातावरणात गारवा पसरलेला असून ही स्थिती या आठवड्यात कामय राहणार आहे. रत्नागिरीत रविवारी संध्याकाळी किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सियस होते. सोमवारी सकाळीही तापमानात ४ ते पाच अंशांची घट झाली होती. सकाळी कमाल तापमान २५ अंश होते. किमान तापमानात घट झाल्याने हवेत दिवसभर गारवा होता. तसेच सकाळच्या सत्रात आता धुकेही दाटू लागल्याने थंडीचा मुक्काम वाढणार असे दिसते आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 24-01-2023