लांजा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लांजा तालुका व्यापारी संघटनेने उद्यापासून आठ दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ ते २२ मे या आठ दिवसांच्या कालावधीकरिता बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी दिली आहे. यामध्ये जीवनावश्यक म्हणून आजवर उघडी असलेली असलेली भाजी, किराणा, बेकरी या दुकानांसह हा कडकडीत बंद पाळण्याचा एकमुखी निर्धार लांजातील सर्व व्यापाऱ्यांनी घेतला आहे. केवळ वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने उघडी राहतील. तरी शहरातील नागरिकांसह तालुक्यातील जनतेने याबाबत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसह अन्य नियमित वापरातील महत्त्वाच्या गोष्टी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गुरुवारी करून ठेवणे अशी माहिती प्रसन्न शेट्ये यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:27 PM 14-May-20
