मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७,५२४ झाली आहे. गेल्या २४ तासांत १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २०,४४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या २४ तासांत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यूची संख्या एक हजाराच्या वर जाऊन एकूण संख्या १०१९ झाली आहे.
