सावर्डे : कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिवस सांगता समारंभ करण्यात आला मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.
मराठी हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने व चर्चासत्र असे उपक्रम घेण्यात आले असून मराठी भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, अशा प्रकारचा सूर चर्चासत्रातून निघाला. मराठी भाषेत अनेक चांगले पुस्तके आणि लेखक यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. पुस्तके प्रत्येक मराठी माणसाने वाचली पाहिजेत. त्याशिवाय मराठी भाषेचे महत्व आणि आपला इतिहास समजणार नाही. भाषा टिकली तर समाज, संस्कृती टिकेल आणि आजच्या काळात समाज आणि संस्कृतीची खूप मोठी गरज आहे. हे काम मातृभाषा म्हणजे मराठी भाषा करेल अशा प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले.
मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषा संवर्धन काळाची गरज व माझा आवडता लेखक, कवी याविषयी संजय चव्हाण, संजना जगोष्टी, दिव्या कदम, वैष्णवी कांबळे, ओमकार रानडे व सिद्धी लोंढे यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मराठी भाषेचे महत्व प्राचार्य तानाजी कांबळे यांनी विशद केले. प्रा. सुनील जावीर यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 01-02-2023