विहिरींसाठी क्रांती, कृषी स्वावलंबनमधून अर्थसहाय्य

0

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना विहीर उभारणी करिता आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.

अनुसुचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी योजनेत प्राधान्याने सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जमिनीत उत्तम पीक येण्यासाठी जमिनीत पिका योग्य ओलावा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. यासाठी शेतकऱ्यांना मुबलक पाणी आवयश्क शेतकऱ्यांना हीच सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात आहे. अनुसूचीत जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविली जात असू, या अंतर्गत कोकणातील जिल्ह्यात मागील दोन वर्षांच्या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर उभारणीकरिता एकूण चार कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातच मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, त्यांच्या पीक उत्पादनातदेखील वाढ झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिर उभारणीसाठी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तसेच जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून कृषी क्षेत्रात देखील मोठी प्रगती होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात आंबा पिकाचे उत्तम उत्पादन घेतले जात असून, यावर्षी सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंब्यांना दरवर्षी बाजारात उत्तम मागणी देखील असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करून नव्याने विहीर उभारण्यासाठी तसेच शेतात असलेल्या विहिरींची दुरुस्तीसाठी योजनानिहाय आर्थिक साहाय्य करण्यात येते…

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 08-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here