पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यूप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकरवर खुनाचा गुन्हा दाखल

0

राजापूर : येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले महिंद्रा थारचे चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भा. दं. वि. कलम ३०२ लावण्यात आले आहे.

या पूर्वी या अपघात प्रकरणी आंबेरकर याच्यावर कलम ३०८ व सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर येथील न्यायालयाने आंबेरकर याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. या
अपघाताबाबत संशय व्यक्त होत असतानाच त्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी दुपारी हा अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले होते. अपघातानंतर मृत्यूमुखी पडलेले पत्रकार शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसानी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर भा. दं. वि. कलम ३०८ तसेच सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल होता.

या प्रकरणी आंबेकरकर याला अटकही झाली होती. येथील न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. अपघातास कारणीभूत ठरलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुध्द भा. दं. वि. कलम ३०२ लावण्यात यावे, अशी मागणी वाढत असतानाच अखेर राजापूर पोलिसांनी आंबेरकर याच्यावर कलम ३०२ लावले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 09-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here