खरीप हंगामासाठी २० हजार २५० मेट्रिक टन खताची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी २० हजार २५० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ३३९.६४ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खताचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यास ३०६ खते विक्रेत्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, याची काळजी घेत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केले असून मागणीनुसार उपलब्धता करून दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here