जिल्हा विशेष कारागृहातून 19 कैद्यांना 45 दिवसांच्या पॅरोलवर सोडले

रत्नागिरी : मुंबईसह अनेक कारागृहांमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्र शासनाने इमर्जन्सी पॅरोल म्हणून शिक्षा झालेल्या कैद्यांना 45 दिवसाच्या रजेवर सोडण्याचे आदेश काढले. त्यानुसार जिल्हा विशेष कारागृहातून शिक्षा झालेल्या 8 पक्क्या कैद्यांना 45 दिवसाच्या पॅरोलवर सोडले आहे. विशेष म्हणजे अजूनही रत्नागिरी जिल्हा कारागृह कोरोनापासून सुरक्षित आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वीच शासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. कारागृह अंतर्गत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकेल, अशा कैद्यांना 45 दिवसाच्या पॅरॉलवर सोडण्यात आले. रत्नागिरी विशेष कारागृहातील 19 कैद्यांना त्याचा फायदा झाला. मात्र तरी 150 कच्चे-पक्के कैदी अजून कारागृहात आहेत. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी कारागृह प्रशासनाने घेतली आहे. प्रत्येकाला मास्क, बराकमध्ये हॅण्डवॉश, सोशल डिस्टन्स आदींची सक्ती केले आहे. शासनाने दिलेले नियम आणि निकष अतिशय काटेकोरपणे पाळले जात आहेत. कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख आणि तुरुंग अधिकारी अमेय पोतदार व अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा विशेष कारागृह अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here