राजापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातील मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे हे ६ फेब्रुवारी रोजी राजापूर पेट्रोल पंपातून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या थार गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्या दि. १४ फेब्रुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 15-02-2023