गणपतीपुळे : आर्थिक परिस्थितीला कंटाळून प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे १७ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान घडली. रवींद्र गोपाळ दुर्गवळी (४४, रा. मालगुंड, दुर्गवळीवाडी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
त्यांचा पुतण्या संजय गणपत दुर्गवळी यांनी गणपतीपुळे पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. घरामध्ये कोणी नसताना कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीने लोखंडी बारला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गणपतीपुळे मालगुंड दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव अधिक तपास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 18-02-2023