रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी गेण्यात येणाऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी परीक्षा परिषदेने आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे.
ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेमार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक परिषदेच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या आहे. त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी परीक्षा परिषदेने आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे.
ही परीक्षा दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रवेश प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठीचा दुवा आणि परीक्षेबाबतच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 21-02-2023