मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या दोन दिवसांपासून युक्तिवाद केला.
सिब्बल आजही युक्तिवाद करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कालच्या सुनावणीवेळी गटनेत्याची निवड, प्रतोदची निवड, पक्षप्रमुखांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आदी मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आला. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवरही बोट ठेवण्यात आलं. आज इतर मुद्द्यांवर सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 23-02-2023