तळीराम ग्रुप खरंच जबरदस्त ! यातून समाजाने आदर्श घ्यावा

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे सर्वच मद्यविक्री दुकाने बंद होती. अनेकांच्या घशाला कोरड पडली होती. सरकारने मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देऊनही न आवरता येईल इतकी गर्दी होईल या भीतीने विक्रेते दुकाने उघडत नव्हते. मात्र दुकाने उघडल्यावर चित्र फार वेगळंच दिसलं. कुठेही गर्दी न करता सोशल िडस्टंन्स ठेवत ग्राहक वाईनमार्ट मधून दारू खरेदी करत होते. लाईन रस्त्यावर गेल्याने अनेकांनी अपघाताचा धोका नको म्हणून चक्क हेल्मेट देखील घातली होती. सर्व सरकारी नियमांचे पालन करीत तळीराम ग्रुपने जो समंजसपणा दाखवला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. धान्यदुकानात, बाजारपेठेत गर्दी करणाऱ्या समाजाने यातून आदर्श घ्यायला हरकत नाही असे देखील अनेकजण बोलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here