मुंबई : भाजपने राज्य सरकारच्या विरोधात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन पुकारले आहे. तर हे आंदोलन कसे करावे याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर माहिती काल दिली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. ‘दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! असे म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
Home महाराष्ट्र ‘पाटलांनी आंदोलनापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते तर बरे झाले असते’