रत्नागिरी : नगरपालिकेने कर वसुली मोहीम जोरात सुरु केली आहे. अनेकवेळा सूचना देऊनही आजतागायत ज्या करदात्यांनी आपली थकीत रक्कम भरली नाही त्यांच्यावर आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याच कारवाई अंतर्गत आज नगरपालिकेने २० घरांच्या नळ जोडण्या तोडल्या आहेत. आजवर एकूण येणे कराच्या सुमारे ६५ टक्के इतकीच वसुली झाली आहे. सुमारे ८५ टक्यांपर्यंत हि वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच आता नगरपालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
13:14 13-03-2023